आपल्याला भेटणारी माणसे आपल्याला काही ना काही देऊन जात असतात. काही जण कायम लक्षात राहतात. या माणसांच्या आठवणीनेही आनंद मिळत असतो. अशीच काही माणसे सुरेश ठाकूर यांना भेटली आणि ठाकूर यांनी त्यांचे व्यक्तिमत्व, आठवणी शब्दबद्ध केल्या. गावातील ग्रंथपाल काका दळवी यांच्यापासून शब्दचित्रांना सुरुवात होते.
गुरुजन, दाजी, वासूअण्णा, आजाबाबू, गावकरदादा, लक्ष्मणराव वझे अशी माणसे एका पाठोपाठ एक पुस्तकातून भेटीला येतात. उखाणे आबा, दुसरी जन्मदात्री ठरलेली मुक्ताक्का, अशा एका ना अनेक व्यक्तींची ओळख पुस्तकातून होते. दत्तूकाका आणि व्हिजिट फीचे किस्से वाचायला मिळतात. अनेक अनेक किस्से, प्रसंग यांतून ही व्यक्तिमत्वे खुलत जातात.
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन
पाने : २२४
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या पुस्तकातील ‘ते पुलकित दिवस’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)